Wednesday, 27 September 2017

Effective Ways To Get Out of a Negative Mindset

Effective Ways To Get Out of a Negative Mindset

It is too easy to get into a negative mindset which invariably leads to unhappiness and depression. To avoid being overwhelmed by negativity we need to make a conscious effort to avoid the experience. When life seems like a perpetual dark tunnel these are some suggestions to change your outlook on life.

Don’t Cherish Destructive Thoughts.

Often we don’t realise how much we subconsciously cherish negative thoughts. It may seem counter intuitive, but often a negative frame of mind occurs because we won’t let go of the negative thoughts and ideas. Sometimes the mind clings on to these thoughts with a feeling of self pity or injured pride. We don’t like the negative frame of mind, but at the same time are we consciously trying to overcome it? The problem is that if the negative thoughts go round and round in our mind they can become powerful and we lose a sense of perspective. Just make a conscious decision to ignore the negative flow of thoughts and sentiments and be persistent in these attempts.

Do You want to be Happy or Miserable?

Do you want to be always happy?
Then give up fighting
For negativity
And learn the beautiful art
Of self-encouragement.

Sri Chinmoy [1]

We should feel a negative mindset is a choice. If we feel a victim to our own emotions and thoughts, nobody else will be able to help us. We should feel that by holding on to a negative frame of mind, we are inevitably choosing to be unhappy; each negative is a conscious decision to be miserable. If we really value the importance of our own inner peace and happiness, we will aspire to cultivate this through good, uplifting thoughts. Next time you feel the onset of a depressed state of mind, just ask yourself the question: Do I want to be happy or Miserable?

Spend Time With Positive People

The best antidote to negativity is simply to spend time doing positive, uplifting activities. Sometimes if we analyse and examine our own negativity it does nothing to reduce it. By engaging in useful fun activities, we forget about the reasons for our negativity; this is often the most powerful way to overcome a depressed state of mind.

Don’t Accept Negativity from Other People

We live in a world where there are no shortage of pessimists, critics and doom-mongers. There will always be people who can find the negative in life; but, there is no reason why we have to ascribe to their world view. For example, often in an office environment there is a negative attitude to the workplace, but, even if there are faults and limitations we don’t have to allow them to make us a negative person.

Let Go of Thoughts

If you can learn to control your thoughts, you can control the experience and emotions of life. The best antidote to negativity is learning the art of meditation. Meditation is more than just relaxation; it is a change in consciousness. We move from the limited perspective of our mind and discover an inner source of happiness.

Live in the Heart

The nature of the mind is to be suspicious and critical. If someone does 99 good things and 1 bad thing, the mind will invariably remember the bad thing. If we allow ourselves to be drawn into highlighting the mistakes of others we will invite a negative mindset. However, if we live in the heart we are not drawn to the faults of others (even if they are insignificant). It is in the heart that we can have a true sense of oneness with others, their faults seem insignificance and we can feel a sense of identity with the achievements of others.

Don’t Sit Around Doing Nothing

The worst thing for a negative frame of mind is to mope around feeling sorry for ourselves. Ruminating on our bad luck / worries / fears will not diminish them in any way. Exercise can be a powerful way to bring about a new consciousness. Negativity is often associated with boredom and lack of purpose. Stop endlessly checking emails and surfing web, look for something good to do.

Force Yourself to Think of Three Positive Thoughts.

If you are feeling really miserable and have a low sense of self esteem, try thinking of 3 good things that you have done. At time our own mind can be our worst enemy and very self critical. It is important not to lose a sense of balance; for the various bad things we have done, we have also done some good things.

Don’t Think Anything You Wouldn’t Say in Front of People

We often think things we would never say in front of people. If you are annoyed, disappointed with someone else, imagine what you would say to them in person. Sometimes when we are with people we are forced to behave; even if we are not particularly sincere the effort to avoid negativity can help us to overcome our bad mood.

Benefits of Reducing the Ego

Benefits of Reducing the Ego

The ego is the part of us that identifies with our body and the personality of ourself. The ego is the little ‘I’ which thinks thoughts such as: “I am good.” “I am bad,” “I’m much better than that person,” “I am inferior to everyone else”.

Previously, I looked at how to reduce the influence of the ego. In this article I thought I would look at reasons why it is a good idea to reduce the ego.

Ego is Caught in the duality of good and bad

For every good thought, there is an equal and opposite idea. For example, when we have a tremendous sense of pride, we feel an equal measure of humiliation when our pride is punctured. When the ego criticises other people, the ego feels an equal measure of guilt when the roles are reversed. To avoid feelings of inadequacy, we should not seek to just avoid doing the wrong thing, we should also seek to reduce our ego; it is this that will enable us to detach from feelings of pride and humiliation.

Ego knows no Peace

When we live in the ego, we always will find inner peace an elusive goal. The reason is that the ego constantly worries and doubts. When we are subject to these thoughts a lasting peace cannot take hold. To attain peace of mind, we need to let go of the ego and live in the here and now. See also Seven steps to inner peace

Ego lacks a sense of oneness

The ego likes to be loved, appreciated and adored. But, in the love of the ego, there is an expectation of receiving things in a certain way. When the ego loves it is about possession. It wants to hold on to and own another person. The love of the ego is conditional; it gives in expectation of receiving something in return. True love is about creating a sense of oneness with other people. When we identify with others to such an extent they no longer feel separate from ourselves, we will can give without expectation. But, this experience cannot be achieved through identifying with the ego.

The ego can never be perfect

From the ego’s perspective the secret of life is to always do the right thing and be the right person. The problem is that this is impossible; it is simply human nature that we make mistakes. There will be times when the ego will inevitably feel disappointed. The solution is not to avoid ever making a mistake; the solution is to reduce the ego, so we can enjoy life, even if we don’t live up to the high expectations of the ego.

It is the Ego that divides.

Conflict arises because we feel separated from other people. We see others as the enemy and therefore we feel threatened by them. The ego may not like to admit it, but it constantly doubts and worries about what people think. The ego identifies with our limited self and so this inevitably leads to feelings of Inadequacy. From this feeling of inadequacy the ego gains a desire to assert its superiority. This leads to displays of outer strength. This desire to assert supremacy is a constant source of conflict in the world. If we could let go of the desire to prove our strength and supremacy, a peaceful co-existence would be much easier.

The ego is Nearly Always wrong.

Analyse what your thoughts say about yourself. The ego is tricky because sometimes it likes to make us think we are really good; the ego gives us a false sense of pride and superiority. At other times, the ego can swing to the other extreme and make us feel miserable and hopeless. Neither extremes are true, the ego often likes to trick us into thinking we are the wisest person; but, it is similarly wrong when it makes us feel miserable for a tiny mistake. Holding both extreme views about ourselves encourages us to have a misplaced idea of what we are; both lead to unhappiness.

Tuesday, 26 September 2017

वि. वा. शिरवाडकर संग्रहित पोस्ट

वि.वा. शिरवाडकर

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवीलेखकनाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

वि.वा. शिरवाडकरजन्म नाववि.वा. शिरवाडकरटोपणनावकुसुमाग्रजजन्म२७ फेब्रुवारी, १९१२
नाशिकमृत्यू१० मार्च, १९९९राष्ट्रीयत्वभारतीय कार्यक्षेत्रसाहित्य, कवी,,नाटककारवडील

गजानन रंगनाथ शिरवाडकर

काकांनी दत्तक घेतले_नाव = वामन शिरवाडकरपुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार

मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.

जीवन

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. [१] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबतस्वराज्यप्रभातनवयुगधनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.

१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.

वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

लेखनशैली

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटककादंबरीकथालघुनिबंधइत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

साहित्यविचार

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[२][३]

कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.

कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.

"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्‍मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसार्‍यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."

कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. तसेच त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे करता येईल.

कलेचे आधारभूत तत्त्व 

कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणीत लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.

ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणार्‍या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)

या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” 

Friday, 8 September 2017

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे सुविचार

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे सुविचार

१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.

१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

१८) आधी विचार करा; मग कृती करा.

१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

२०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

२१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

२२) अतिथी देवो भव ॥

२३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

२४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

२५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

२६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

२७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

२८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

२९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.

३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.

३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची

३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!

४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी

४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.

४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा

४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.

५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे

५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!

६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.

६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.

७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

८० प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

९६) अंथरूण बघून पाय पसरा.

९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

१००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

१०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

१०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

१०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

१०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

१०५) विद्या विनयेन शोभते ॥

१०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.

१०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

१०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

१०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

१११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

१२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

१२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

१२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

१२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

१२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

१२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

१२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

१२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

१२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

१३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

१३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

१३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

१३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

१३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

१३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

१३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

१३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

१४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

१४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

१४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

१४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

१४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

१४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

१४८) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

१४९) जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.

१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

 २०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.

२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.

२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.

२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

२२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.

२५१) आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?

२५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

२५३) पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

२५४) आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

२५५) अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.

२५६) मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

२५७) नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.

२५८) अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

२५९) सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.

२६०) शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.

२६१) गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

२६२) दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

२६३) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.

२६४) पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !

२६५) स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.

२६६) अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.

२६७) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

२६८) स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.

२६९) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

२७०) क्रोध माणसाला पशू बनवतो.

२७१) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

२७२) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

२७३) जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !

२७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

२७५) परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

२७६) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

२७७) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.

२७८) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

२७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

२८०) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.

२८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.

२८२) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

२८३) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

२८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

२८५) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.

२८६) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

२८७) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.

२८८) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

२८९) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

२९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

२९१) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.

२९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.

२९३) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

२९४) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .

२९५) न मागता देतो तोच खरा दानी.

२९६) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

२९७) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

२९८) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही

२९९) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

३००) दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

 

Thursday, 7 September 2017

मी नोकरी करते


कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रीच्या लग्नानंतरच फलित असेल तर "नको तो संसार एकटच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा, एकांतात अगदी एकटच राहून जीवन काढावं" किंवा हे जीवनच नको असं म्हणणार्‍या कितीतरी स्त्रिया जवळजवळ नोकरी करणार्‍यांमध्ये किमान १० स्त्रियांमागे ७ स्त्रिया असतात, याचा अर्थ काय? परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत. फरक एवढाच की क्षेत्र किंवा स्वरुप बदललेलं आहे.


स्त्रीने नोकरी करावी का नाही? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं. बर्‍याच वेळा ते तिच्या स्वत:वरही असतं. आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसणं हे शक्यच नाही. किंबहूना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बिजे आहेत. आज जवळजवळ सगळीच क्षेत्रे तिने काबीज केली आहेत.

तुज पंख दिले देवाने
कर विहार गगनावरती !


देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंत:करणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.

देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंत:करणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे. पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो, तर एकीकडे ती भरडली जाते. १० - ६ ऑफिसमध्ये काम करणारी स्त्री सगळ्यानांच खुप सुखी, आनंदी वाटते. पण १० वाजता ती ऑफिसला येते म्हणजे तिला सकाळी ९ - ९.३० ला घर सोडावेच लागते, किंबहुना काहींना याच्यापेक्षाही लवकर. तेही घरातली सगळी कामं उरकून. काही राहीलं नाही ना याची वारंवार खात्री करुन घ्यावी लागते. सकाळी ५ - ६ ला उठून ९ पर्यंत म्हणजे ३ - ४ तासात तिला दिवसभराचं सगळं घरकाम करायच असतं. सगळ्यांचे लाड, हट्ट पुरवायचे शिवाय ऑफिसला येताना जेव्हा तिचं मुल आई ऑफिसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणे बघते व तिला आज जावू नकोस ना! म्हणून सांगते तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ हरिणीसारखी होणारी स्थिती कुणालाच दिसत नाही. त्या इवल्याशा चिमण्या जिवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जिवावर येतं. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल ह्याचा कुणी विचारही करत नाही. उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो.

आता मला सांगा एवढसं मुल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते, तर ती गरज आहे. कारण आजकालच्या या महागाईच्या जमान्यात पुरुष एकटा सगळं कसं चालवू शकेल? मुलांना उज्ज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये व सर्व सुख-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, म्हणून ती नोकरी करत असते ना?

बाहेरच्यांच जाऊ दे पण घरातल्याचं काय? ती घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राब-राब राबते. पण त्यांच्यालेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही. का तर चकाचक ऑफिसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार ए.सी मध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते, म्हणजे ती त्या ए.सी असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का? तिला फुकटच पगार मिळत असेल का? आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही. मग तो कंपनीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का? की काही काम न करता फुकट पगार देईल आणि ते ठिक आहे पण त्याच कंपनीत पुरुषसुध्दा काम करतात, त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे माहीत असतं, तरी घरी आल्यावर आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही ती बाहेर जाऊन सागरगोटे खेळून आलीय व आपण खुप मोठा डोंगर फोडून आलोय या अर्विभावात सोफ्यावर लोळत, टि.व्ही बघत एक एक आज्ञा देत असतात व नम्र सेवकाने/ बायकोने कुरकुर न करता व पटापट त्या ऎकल्या पाहीजेत हि अपेक्षा असते. म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वत:च पैसे देणारी कायमस्वरुपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात.

आता इकडे बघा. आपल्याला जेवढं काम आहे तेवढंच काम सोबत असणार्‍या स्त्री सहकार्‍याला असतं हे माहित असूनही तिला ऑफिसमध्ये कमी लेखतात. तिला घरची सगळी कामं उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे उशीर होतो तेव्हा झाली लगेच त्यावर चर्चा, लगेच लेटमार्क लावला जाणार. कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार. कधी मुलांना बरं नाही म्हणून लवकर गेलं तर त्यावर लेक्चर ऎकावं लागत आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जीव तुटत असतो.

म्हणजे बघा ना ! घरी जरा कुठे कमी पडली तर घरचे बोलणार व ऑफिसमध्ये काही कमी-जास्त झाले तर ऑफिसमधले बोलणार. स्त्रीसाठी खरी तर हि दोन विश्वच असतात. पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबणा होत असेल, ती भरडून निघत असेल तर नको हे जीवन आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असचं ती म्हणणार ना?

असचं एक जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे, अगदी उच्चशिक्षीत इंजिनिअर झालेली ती स्वत:च्या कामात खुप हुशार, वरिष्ठ/बॉस सगळेच तिच्या कामावर बेहद्द खुष. शिवाय तिने लव्ह मॅरेज केलं त्यामुळे नवराही प्रेमळ (प्रेमळ कि आपमतलबी कदाचीत) पण बायकोने नोकरी केलीच पाहिजे या मताचा शिवाय तिलाही नोकरीची आवड असल्याने तिचंही व त्यांचही फावलं. पण खरा प्रॉब्लेम तर पुढे होता. त्याच्या आई-वडिलांनी, भावांनी जे कर्ज केलं होतं ते या दोघांना फेडायला सांगतलं. तरीही तिने ते आनंदाने मान्य केलं. घरापासून ऑफिस खुपच लांब असल्याने तिला रेल्वेने प्रवास करावा लागतो. प्रवासात जवळ-जवळ २-२ तास यायला व जायला लागतात. १० वाजता ऑफिस चालू होते. म्हणजे तिला सकाळी ८ वाजता घर सोडाव लागतं. त्यात इंजिनियर असल्याने तिला प्रत्यक्ष साईटवर उन्हात उभं राहूनच काम कराव लागतं त्यामुळे ऊनं व प्रवासाची दगदग याचा खुप त्रास व्हायचा तिला. शिवाय सकाळी ऑफिसला जाताना घरातली सगळी कामं करुन जायचा असा दंडक होता. कामाला बाई तर अजिबात लावायची नाही. शिवाय सुट्टीचा दिवस म्हणजे आरामाचा, पण नाही तिच एवढं मोठं नशीब कुठे? तिला त्या दिवशी दुप्प्ट-तिप्पट काम करायला लागतं पण कुणाकडून साधी मदतीची अपेक्षाही करायची नाही उलट बोलणी मात्र ऎकुन घ्यायची. तरी पण ती कधीच बोलायची नाही. कुणावर रागवायची नाही, वैतागायची नाही. का तर कुणाचं मन दुखावू नये म्हणून.

असचं एकदा ऑफिसच्या कामानिमित्त तिला बाहेरगावी ४ दिवसांसाठी जायला सांगितली, तिला एका परदेशी इंजिनिअरकडून खुप काही शिकण्यासारखं होतं. पण स्त्रीने एकटीने कुठे जाणे अजूनही समाजास तितकसं मान्यही नाही व धोक्याचही आहे. तिने त्यांना प्रथम नकार दिला पण तिच्या वरिष्ठांचं म्हणणं होत की तु गेलंच पाहिजेस, तुझंच ते काम आहे, त्यामुळे मग तिने ऑफिसमध्ये सांगितलं की माझ्या सोबत मैत्रिण किंवा पती असतील तरच मी जाईन. तिचे पतीही अगोदर तयार झाले. ऑफिसमधून तिचं व तिच्या पतींची त्या गावी राहण्याची व्यवस्था करण्यात आली व जायची सगळी तयारी झाली. निघायच्या ऎनवेळी तिच्या पतीने येण्यास नकार दिला. तिला अक्षरक्ष: रडू कोसळलं, तिन त्यांना अनेक परीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! त्यांनी तुसुध्दा जायचं नाही असं स्पष्ट सांगितलं. शेवटी नवर्‍यापुढे तिचं काहीही चाललं नाही. त्याला न जुमानता जाता आलं असतं पण पुढे भांडणे वाढली असती त्यामुळे ति स्वत:च्या मनाला समजावत बसली. एका सुशिक्षीत पुरुषाने केलेला हा मानसिक छळच नाही का? फक्त स्वरुप वेगळं. दारू पिऊन मारामारी करणारा नव्हता, एरवी तिची कितीही काळजी घेतली, रोज फोन करुन जेवली का हे विचारलं की झालं आणि जेव्हा खरी मदतीची प्रोत्साहनाची गरज असते तेव्हा मात्र तिला मागे खेचणं याचा काय उपयोग?

ती दुपारी जेव्हा ऑफिसला गेली तेव्हा तिच्या बॉसने बेजबाबदार म्हणून सर्वासमक्ष तिला बोलले, तुम्हाला काम करायला जमत नसेल तर घरी जाऊन बसा, या शब्दात तिला सांगितलं. जे वरिष्ट तिच्या कामाची स्तुती करायचे तेच जेव्हा तिला बेजबाबदार म्हणून तिचा या शब्दात अपमान करतात, तेव्हा तिच्या इतके दिवस प्रामाणिकपणे काम केल्याचा काय उपयोग झाला. इथेही तिला बोलणीच खावी लागली. तेव्हा ती म्हणाली, की खरचं या जीवनाचा काय उपयोग कितीही कुणासाठी काहीही केलं तरी कुणी आपला विचार करतच नाही. त्यापेक्षा दूर कुठेतरी निघून जावं व एकटच भरकट फिरावं.

खरचं या सगळ्यात तिचं काय चुकलं, नवर्‍याशी भांडुन ती एकटी गेली नाही हे की, आपला संसार टिकावा म्हणून वादावादी टाळली हे की, एका परदेशी माणसाकडून नविन काही शिकण्याची इच्छा मनात घेतली हे की, ती बाहेरगावी जायला तयार झाली हे, की ती हुशार आहे हे? तिचं काय चुकलं असेल तर ते हे की तिने कधीच स्वत:चा विचार केला नाही, स्वत:च्या मताची किंमत केली नाही, स्वत:चा मनाचा कौल घेतला नाही व स्वत:च्या इच्छांना नेहमीच पायदळी तुडवलं कधी बाहेरच्यांसाठी तर कधी घरातल्यांसाठी. हेच आणि असचं जीवन जर एखाद्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत स्त्रीचं असेल तर अडाणी, गावंढळ म्हणून जगणचं चांगलच ना. कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता.

हि मुलगी आज कितीतरी जणीचं प्रतिनिधित्व करत आहे. आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोरे जाव लागतं आहे. ह्या लिखाणाचा माझा उद्देश कुठलेही ऑफिस किंवा कुणाच्याही घराच्यांवर आरोप करण्याचा नाही, तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणार्‍या आहेत. तेव्हा ती स्त्री आपली कुणीतरी आहे, कुणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याकडे फक्त इंजिन म्हणून न बघता ती लवचीक, प्रेमळ, वात्सल्यमयी, सहनशील आहे. तिला घराच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफिसच्यांकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर ठरवून खरचं मनापासून प्रयत्न केले तर तिला खरचं एक मानाचं स्थान मिळेल. जर ती समाधानी, आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल, तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने बहरून जाईल. सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवीसुंदर वाटायला लागेल. तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फुटतो, तिच्या स्पर्शाने परीसाचेही सोने होते, तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल कृपया ओढू नका. तिची प्रगती लांबूनच बघत रहा.

मी अंगणातील जाई, मी तुझीच रे आई
जाते सोडूनी जेव्हा तुजला, होते भेटण्याची घाई
दिवसरात्र ही तुझ्याचसाठी लढते ही लढाई
येईन जेव्हा धावत तेव्हा म्हणशील का रे हळूच आई
सुखी असू दे घरकुल माझे नमिते देवा तुझ्याच ठाई ॥