Saturday, 24 November 2018

महाराजांबद्दल थोडेसे

*महाराजांबद्द्ल दोन शब्द*

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.......

■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.

■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............

■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......

■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.

■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या

■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम....