Monday, 18 March 2019
Friday, 15 March 2019
अभ्यास मोहीम...शोध ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांचा #*
*# अभ्यास मोहीम...शोध ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांचा #*
*# 14 मार्च 2019 #*
आजची भटकंती....ही खऱ्या अर्थाने सार्थकी लागली.अचानक बेत ठरला, रायबा यांच्या कडे तुषार दिघे आले होते , त्यांच्या शी गप्पा मारत असताना अचानक, त्यांनी विषय काढला की आमच्या गावात बरीच मंदिरे आहेत, त्यांची माहिती आपण सर्व सामान्य जनतेपर्यंत व सह्याद्रीत भटकंती करणाऱ्या प्रत्येक भटक्या पर्यंत पोहचावी. जेणेकरून अंधाराकडून..प्रकाशाकडे नेणाऱ्या या वास्तू विषयी जनमानसात याची ख्याती व्हावी. अवस्थेत असलेले रांजेश्वर, नागेश्वर मंदीर , विष्णू मंदीर, व त्याठिकाणी असलेल्या बाबाजी भिकाजी गुजर यांचा वाडा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला , व काही अल्पावधीत नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक मंदिरे, वाडे आम्हि पाहण्यासाठी निघालो.राहुल नलावडे, तुषार दिघे व मी सुशिल दुधाणे , निघालो शिवापूर गावाकडे.शिवापूर गावाला महत्व आहे.पूर्वी या भागाला बाग म्हणून ओळखले जायचे.पुण्यातील लाल महाल बांधण्याच्या अगोदर शिवाजी महाराज व जिजाऊ माता याच शिवापूर बागेत राहत होते.कात्रज च्या पुठे अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजेश्वर ( ता.भोर.जि.पुणे ) येथे पोहचलो.मंदीर खूपच छान आहे.या मंदिराची रचना पाहता बनेश्वर मंदीर नसरापूर ची आठवण आल्या शिवाय राहत नाहि.मंदीर ची कलाकुसर खूपच वाखाणन्या सारखी आहे, मंदीर पाहून झाल्यावर बाजूलाच असलेल्या विष्णू मंदीरात गेलो.येथेच बाबाजी भिकाजी गुजर यांचा अंदाजे एक ते दीड एकरात असलेला वाडा पाहिला.वाडा तीन मजली असावा, अशी शक्यता येथील बांधकाम पाहिल्यावर होते.आज मीतीस येथे ' आनंद आश्रम ' आहे.
२८ जानेवारी १६४५ रोजी
शिवरायांनी रांझ्याचा पाटिल बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला, म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली.
वाडा पाहून आम्हि खुळेश्वर मंदिरा कडे धाव घेतली.मंदीर खूपच छान आहे.त्यानंतर आम्हि खेड शिवापूर येथील श्रीरामनगर नागेश्वर मंदीर येथे आलो.हे मंदीर हेमांड पंथी असावे, असे येथील बांधकामांवरून वाटते.मंदिराच्या आवारात आम्हाला काही वीरगळ नजरेस पडल्या.राहुल(रायबा) ने आम्हाला या वीरगळ विषयी माहिती दिली.या सर्व अपरिचित स्थळांना आम्हि भेटी देऊन परतीच्या प्रवासास निघालो.
आपण प्रत्येकाने या स्थळांना अवश्य भेट द्यावी.आमच्या दृष्टीने हे अपरिचित ठिकाण आहे , काहींनी हे पाहिले ही असतील.परंतु बऱ्याच जणांनी या ठिकाणी भेट दिली नसावी, असे आम्हाला वाटते.