Thursday, 24 October 2019

सत्कर्म योगे वय घालवावे

माझ्या मते
एखादी व्यक्ती जर गेली अंत काळात विलीन झाली तर आपल्याला खूप त्रास होतो आणि ते होणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या सोबत आपले भावनिक ऋणानुबंद जुळलेले असतात

पण एक लक्षात ठेवा मित्रानो आपली जन्माची वेळ ठरलेली असते लग्नाची वेळ ठरलेली असते आणि मृत्यूची वेळ ही ठरलेली असते

आणि या सर्वांच्या मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे त्यामध्ये स्वतः ची प्रगती कशी साधायची हे आपण ठवायच असतं.

या मधल्या काळात तुम्ही जेवढे सत्कर्म आणि कुकर्म कराल याचीच गणना मुनुष्य अंताला होणार

तिथे मनुष्य अंता वेळी पैशांची गणना होत नाही हे लक्षात ठेवा मित्रानो

म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलं आहे की सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे

श्रीकांत खताळ

Tuesday, 15 October 2019

कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत

कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत -2
पोटात एक ओठात एक, डोक्यात काहीतरी भलत
कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत

सामाजिक भान हरपून, गेलो जग एकवटत -2
वेळ आली माझ्यावर तेव्हा, बसलो एकटाच पुटपुटत

मी म्हणालो भाऊ कराल क हो मदत -2
ते म्हणाले ये बाबा आता नको येऊ परत -2

आरे वेळ आली तुमच्यावर,मी दिला मदतीचा हात -2
आता वेळ आली माझ्यावर म का करता असा घात

म मी ठरविले, म मी ठरविले
जग हे दिल्या घेतल्याचे आपण नाही पडायचे त्यात

तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला - २
भाऊ मी आहे संकटात भाऊ मी आहे संकटात

क्षणाचा हि विचार न करता शब्द आले ओठी
हो हो या ना आत ,या ना आत

कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत (मिस्कीलीत हास्य)

     कवी :- श्री श्रीकांत सदाशिव खताळ