Saturday, 25 July 2020

गैरसमज


खूपदा असं होतं की आपली अगदी जवळची व्यक्ती तिला काहीतरी सल्ला , मदत आपल्याकडून हवी असते.. काही वेळा तर फक्त ती बरोबर आहे.. म्हणजे त्या व्यक्तीचा विचार ,कृती , घेतलेला निर्णय बरोबर आहे ना याची खात्री हवी असते.. आपण शांतपणे सगळं ऐकून घेतो.. तिचं बरोबर आहे हे तिला सांगतो..

आपलं ह्या व्यक्ती वर मनापासून प्रेम असतं.. तिच्या / त्याच्या बाबतीत चांगलंच घडावं.. यश मिळावं..म्हणून आपण उत्साहाने काही सूचना , सल्ला देतो.. आपला हेतू फक्त त्या आपल्या प्रेमाच्या माणसाचं भलं व्हावं हा असतो..

पण काही वेळा असा अनुभव येतो की हे आपलं माणूस आपण सुचवलेलं काही ऐकत नाही.. म्हणजे आपण त्यांच्या भल्या साठी सांगितलेल्या गोष्टी ते मुद्दाम करत नाहीत.. अशा वेळी प्रश्न पडतो की का असं?? आपलं त्यांच्या विषयी चं प्रेम ,तळमळ दिसत नाही का?? की त्यांना फक्त कोणी श्रोता हवा असतो.. का त्यांचा अहंकार आड येतो?? आपल्याच भल्यासाठी सुचवलेलं सहज अंमलात का आणता येत नाही काहींना??

खूप छोटे सकारात्मक बदल करून आपण आपले आयुष्य सुंदर यशस्वी करू शकतो.. फक्त आपलं मन स्पंज सारखं हवं.. कोणी चांगलं सांगत असेल तर ते टिपता यायला हवं.. उगाच आत्मप्रौढी ने आपली प्रगती थांबवू नये.. सतत नवीन शिकण्याची तयारी हवी.. मन जागरूक हवं.. समोरचा आपल्या भल्या साठी सांगतोयं याची जाणीव हवी.. आणि कमीपणा न वाटता आपल्या प्रगती साठी जरूर स्वतःमध्ये बदल करावे..

तुम्हाला ही असे अनुभव येतात का??इथे राग नाही तर कारण शोधण्याचा प्रयत्न आहे.. विचारल्याशिवाय तर मी ही कोणालाही मत देत नाही.. पण अगदी जवळची माणसे अशी वागतात तेव्हा विचार करावासा वाटतो..