Tuesday, 21 December 2021

न समजणाऱ्या लोकांच्या गोष्टी...



मी ज्या गोष्टी सांगतोय त्या मला काय तुम्हाला पण नाही समजत असणार :-) 

🏵एकटे आई-बाबा मेहनत करून आपल्या ३-४ मुलांना सहज सांभाळून घेतात. परंतु मोठे झाल्यावर त्या ३-४ मुलांकडून आपले वृद्ध आई-बाबा सांभाळले जात नाहीत.

🏵गल्लीतल्या बायका दुपारच्या वेळेला एकत्र जमून तासोनसात एकेमेकांना बद्दल चुगल्या लावतात, चर्चा करतात, दुसऱ्या गल्लीतल्या बायकांना नाव ठेवतात. आणि शेवटी हे सांगून उठतात की “मरू देणा, आपलयाला काय करायचं आहे??”

🏵सनी लिओनी काय करते कोण आहे ती हे सगळ्यांना माहित आहे. तिला बॉलीवूड मधली सध्याची अतिशय प्रियं आणि जास्त मानधन घेणारी अभिनेत्रीचा दर्जा दिलाय. एकीकडे एक विधवा किंवा जिच्यावर बलात्कार झालाय अशा मुलीला समाजात एक “स्त्री” म्हणून सुद्धा सम्मान नाही दिला जात.

🏵इकडे, सलमान खान काल रात्री ह्या नटीसोबत पार्टीत दिसला, सई ताम्हणकर हिची नवीन केशरचना ही आहे हे पहिल्या पानावर वृत्तपत्रात छापून येते. महाराष्ट्रात एकूण किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ह्याची चर्चा मधल्या पानामध्ये असते ती पण ५ ओळीची फक्त.

🏵सिगरेट पिणारे एकेमेकांमध्ये स्पर्धा लावतात अरे मी एका दिवसाला १५ ओढतो, मी १८ ओढतो. मी एवढा लांब धूर सोडतो, मी एवढा वेळ धूर पकडून ठेवतो. ह्यात स्पर्धेसारख काय आहे?

🏵लोकांना शासनाची बस सेवा नकोय, शासनाने बांधलेले शौचालय नकोय, शासनाचे विद्यालय नकोय, शासनाचे वसतिगृह नकोय परंतु शासनाची नोकरी हवी आहे.

🏵स्कूटीला ब्रेंक दिलेला असतो ना मग मुली पायानेच का गाडी थांबवतात? मी तर खुपदा पाहिले आहे.

🏵मोबाईलचे रिचार्ज करतात ३९९/-, २९९/-, ४९९/- चे. परंतु बाजारात एखाद्या गरीब शेतकऱ्याणे बटाटे १५ रूपये किलो एवजी १७ रुपये किलो दिले तर त्या २ रुपयासाठी भांडतात.
🏵तलाठ्याकडे कडे काम घेऊन जा तो म्हणतो उद्या या. बँकेत एखादे काम निघाले की ते म्हणतात तिकडच्या काउंटरला जा, तिकडे गेले तर ते म्हणतात उद्या या. काम जास्त काही ३-४ तासाचे नसते बर, खरच १०-१५ मिनिटे लागणार असतात पण ते करून देत नाहीत.
🏵स्वतःच्या पक्षाचा प्रचार करतांना “आम्ही एवढे दिवस काय केलय” हे सांगण्यापेक्षा “एवढे दिवस त्या समोरच्या पार्टीने काय नाही केलय” ह्याचे जास्त पोवाडे का गातात?
🏵“कृपया इथे थुंकू नका” किंवा “कृपया इथे मूत्रविसर्जन करू नका” असे लिहेलेले असते त्यालाच लोक “तेच तेच” करून पुसून टाकतात.
🏵प्रत्येकाकडे घडयाळ असतो, नसला तरी मोबाईल असतोच वेळ दाखवायला, आणि प्रत्येक जण घाईमध्ये असतो. तरी कोणीच हव्या त्या ठिकाणी वेळेवर का पोहोचत नाही?
🏵whatsappp वर काही जण going to औरंगाबाद, feeling sad, I am sorry, maaf kar do na baba, enjoying at nashik असे स्टेटस का ठेवतात?
🏵मांसाहार करणारे पण गजब हा. काही जण फक्त रस्सा खातात, काही जण फक्त मांस, काही जण शनिवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी खातात, काही जण फक्त रविवारी खातात, काही जण नेहमी खातात पण बायकोला माहिती नाही. हे मला खरच समजत नाही?
धार्मिक स्थळ, मंदिरे, ऐतिहासिक जागेला भेट देणारे सगळे जण तिथे जाऊन त्या मंदिरांची महती जाणून न घेता, त्यांची माहिती जाणून न घेता… तिथे जाऊन १००० फोटो कडून मस्त खाल्लेला कचरा तिथेच कुठेतरी फेकून आपल्या घरी परत चालले जातात.
🏵जी भली मोठी रांग मंदिराच्या बाहेर प्रार्थनेसाठी लागलेली असते तेवढीच मोठी रांग वाचनालयाबाहेर का लागतं नाही? वाचनालय रिकामे असते.
🏵काही प्रेमी युगुल ५-६ वर्ष सोबत असतात, काही १०-११ वर्ष नात्यात असतात आणि तरी त्यांचे ब्रेअकप होतात. कस काय यार?
🏵काही तीर्थक्षेत्रात ह्या मार्गाने दर्शनाचे २०० रुपये, मागच्या मार्गाने दर्शनाचे ६०० रुपये आणि सरळ गाभाऱ्यात प्रवेशाचे १५०० रुपये का आकारले जातात.
१५०० रुपयात देव प्रकट होत असले का?
🏵गणेशोत्सवच्या वेळी आमच्या मंडळाचा गणपती उंच, आमचा गणपती जास्त महाग, आमच्याकडे आरतीला जास्त गर्दी अशी मंडळांमध्ये स्पर्धा का लागलेली असते.
 देव आमचा-तुमचा असतो का? देव देखणा-कुरूप असतो का?
🏵आई-बाबा ह्यांच्यावर लिहल्या जाणाऱ्या कवितांचे गुणोत्तर ५:१ आहे. ५ आईवरील कवितांमागे १ कविता बाबांवर असते. बाबांचे गुणगान खूप कमी जण का गातात? आई सगळीकडे दिसते, बाबा तोडके मोडके दिसतात.
मानसशास्त्र  * वर्तन  * behavior *

Wednesday, 8 December 2021

जुने मित्र आता हरवलेत

जुने मित्र आता हरवलेत
 कोणी खुप busy झाले!!
 तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 वेळ पाहुन आता भेटु लागले
 भेटुनही काही मित्र आता
 घड्याळात पाहु लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी मोजकेच बोलु लागलेत!!
 तर कोणी काय बोलावं ते म्हणु लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी success बद्दल बोलु लागलेत!!
 तर कोणी स्वतःचच गुणगान गाऊ लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी माझ तुझ करु लागलेत
 तर कोणी उगाच तिरस्कार करु लागलेत
 कधी जुन्या भांडणाचे आता
 उगाच राग धरू लागलेत
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 सगळं share करणारे मित्र आता
 उगाच खोट बोलु लागलेत
 मित्रा सोबत दुखः वाटणारे
 उगाच खोटी प्रतिष्ठा जपु लागलेत!!

 खरंच जुने मित्र आता पुन्हा
 आठवणीत येऊ लागलेत!!
 एक कप चहासाठी
 पुन्हा कट्टयावर भेटु लागलेत!!
 वेळ न पहाता अवेळी येऊ लागलेत!!
 मनातल्या जुन्या आठवणी
 पुन्हा share करु लागलेत!!

जे आपल्यासाठी योग्य आहे ते देव देतो फक्त काही काळ वाट पहावी लागते.

देव आपल्या मुलांना तेच देतो जे मुलांसाठी योग्य असते

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारन ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.
    आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही.
     तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत.दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते ते यायला वेळ होता.म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे.देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली.
    याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेलतर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो,त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे .