Monday, 10 February 2025

मन

*पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत !*
*तूटलेली लेखणी आणि इतरांशी इर्षा स्वतःच भाग्य लिहू देत नाही !*
*कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही !*
*आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही❗*

*निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आल्यावर पहिली निघुन जाते !*
*प्रकाश आला की अंधार निघुन जातो !*
*पाणी आले की धूळ, घाण निघुन जाते !*
*हवा आली की उष्णता निघुन जाते !*
*त्याच प्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात !*
*म्हणून नेहमी चांगले पॉझिटिव्ह विचार करुया❗*

*मनात उतरण आणि मनातून उतरण हे फक्त आपल्या स्वभाव आणि वागणुकीवर अवलंबून असते❗*

*खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो !*
*भावना कळायला मन लागते ,*
*वेदना कळायला जाणीव लागते ,*
*देव कळायला श्रद्धा लागते,*
*माणूस कळायला माणुसकी लागते,*
*चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,*
*भरभरून जगायला पैसा नाही तर आयुष्य लागते❗*

*मदत आणि स्मित हास्य ही अशी दोन सुगंधी द्रव्ये आहेत. जेवढी तुम्ही दुसऱ्यांंवर शिंपडाल, तेवढे तुम्ही सुगंधीत होत जाल❗*

*आपुलकी असेल तर जिवन सुंदर,*
*फुले असतील तर बाग सुंदर,*
*गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर* 
*आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर❗*

*आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी‼️*

*┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈*