Saturday, 9 November 2019
मर्दा चल उठ जागा हो
Thursday, 24 October 2019
सत्कर्म योगे वय घालवावे
माझ्या मते
एखादी व्यक्ती जर गेली अंत काळात विलीन झाली तर आपल्याला खूप त्रास होतो आणि ते होणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या सोबत आपले भावनिक ऋणानुबंद जुळलेले असतात
पण एक लक्षात ठेवा मित्रानो आपली जन्माची वेळ ठरलेली असते लग्नाची वेळ ठरलेली असते आणि मृत्यूची वेळ ही ठरलेली असते
आणि या सर्वांच्या मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे त्यामध्ये स्वतः ची प्रगती कशी साधायची हे आपण ठवायच असतं.
या मधल्या काळात तुम्ही जेवढे सत्कर्म आणि कुकर्म कराल याचीच गणना मुनुष्य अंताला होणार
तिथे मनुष्य अंता वेळी पैशांची गणना होत नाही हे लक्षात ठेवा मित्रानो
म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलं आहे की सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे
श्रीकांत खताळ
Tuesday, 15 October 2019
कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत
कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत -2
पोटात एक ओठात एक, डोक्यात काहीतरी भलत
कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत
सामाजिक भान हरपून, गेलो जग एकवटत -2
वेळ आली माझ्यावर तेव्हा, बसलो एकटाच पुटपुटत
मी म्हणालो भाऊ कराल क हो मदत -2
ते म्हणाले ये बाबा आता नको येऊ परत -2
आरे वेळ आली तुमच्यावर,मी दिला मदतीचा हात -2
आता वेळ आली माझ्यावर म का करता असा घात
म मी ठरविले, म मी ठरविले
जग हे दिल्या घेतल्याचे आपण नाही पडायचे त्यात
तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला - २
भाऊ मी आहे संकटात भाऊ मी आहे संकटात
क्षणाचा हि विचार न करता शब्द आले ओठी
हो हो या ना आत ,या ना आत
कसा लागेल या माणसाच्या मनाचा अंत (मिस्कीलीत हास्य)
कवी :- श्री श्रीकांत सदाशिव खताळ
Monday, 26 August 2019
निरोप
Our ways may change but not our hearts, Our life may lend us apart but our memories will link us together.
हीच विचारधारा मनात रूजवत, सर्व गुरूजनांना सादर प्रणाम करून, विनायक पाचलग नामक. प्रायव्हेट हायस्कूल या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र, जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, कसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.
सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥
हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे ………….. ते हरणे …….. ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ….. कांहीच बिघडणं ………. सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !
शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-31/2 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतश: अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो कीं, या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल. या शाळेतून माझ्या व्यक्तीमत्वाचं, छोटया कुंडीतून मोठया जमिनीत लावण्यासाइी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन,
बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची,
वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती,
आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी,
या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली,
आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच,
वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.
Thursday, 1 August 2019
सैनिक हो तुमच्यासाठी
ज्याप्रमाणे आपण मातृ ऋण, पितृ ऋण कधी फेडू शकत नाही तसेच माझ्या या भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे ऋण सहजासहजी फिटणारे नाही . माझ्या या बांधवांकरिता मी एक संग्रहित केलेली कविता सादर करते
नाही स्वतःची चिंता
उभे सैनिक सीमेवर।।
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर।।१।।
आहात तुम्ही म्हणून
जगतो आम्ही आरामात।।
चिंता करता देशाची
न गुरफटता नात्यात।।२।।
नाही जुमानत कधी
ऊन पाऊस वारा।
तुमच्यामुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा।।३।।
Monday, 18 March 2019
Friday, 15 March 2019
अभ्यास मोहीम...शोध ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांचा #*
*# अभ्यास मोहीम...शोध ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांचा #*
*# 14 मार्च 2019 #*
आजची भटकंती....ही खऱ्या अर्थाने सार्थकी लागली.अचानक बेत ठरला, रायबा यांच्या कडे तुषार दिघे आले होते , त्यांच्या शी गप्पा मारत असताना अचानक, त्यांनी विषय काढला की आमच्या गावात बरीच मंदिरे आहेत, त्यांची माहिती आपण सर्व सामान्य जनतेपर्यंत व सह्याद्रीत भटकंती करणाऱ्या प्रत्येक भटक्या पर्यंत पोहचावी. जेणेकरून अंधाराकडून..प्रकाशाकडे नेणाऱ्या या वास्तू विषयी जनमानसात याची ख्याती व्हावी. अवस्थेत असलेले रांजेश्वर, नागेश्वर मंदीर , विष्णू मंदीर, व त्याठिकाणी असलेल्या बाबाजी भिकाजी गुजर यांचा वाडा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला , व काही अल्पावधीत नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक मंदिरे, वाडे आम्हि पाहण्यासाठी निघालो.राहुल नलावडे, तुषार दिघे व मी सुशिल दुधाणे , निघालो शिवापूर गावाकडे.शिवापूर गावाला महत्व आहे.पूर्वी या भागाला बाग म्हणून ओळखले जायचे.पुण्यातील लाल महाल बांधण्याच्या अगोदर शिवाजी महाराज व जिजाऊ माता याच शिवापूर बागेत राहत होते.कात्रज च्या पुठे अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजेश्वर ( ता.भोर.जि.पुणे ) येथे पोहचलो.मंदीर खूपच छान आहे.या मंदिराची रचना पाहता बनेश्वर मंदीर नसरापूर ची आठवण आल्या शिवाय राहत नाहि.मंदीर ची कलाकुसर खूपच वाखाणन्या सारखी आहे, मंदीर पाहून झाल्यावर बाजूलाच असलेल्या विष्णू मंदीरात गेलो.येथेच बाबाजी भिकाजी गुजर यांचा अंदाजे एक ते दीड एकरात असलेला वाडा पाहिला.वाडा तीन मजली असावा, अशी शक्यता येथील बांधकाम पाहिल्यावर होते.आज मीतीस येथे ' आनंद आश्रम ' आहे.
२८ जानेवारी १६४५ रोजी
शिवरायांनी रांझ्याचा पाटिल बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला, म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली.
वाडा पाहून आम्हि खुळेश्वर मंदिरा कडे धाव घेतली.मंदीर खूपच छान आहे.त्यानंतर आम्हि खेड शिवापूर येथील श्रीरामनगर नागेश्वर मंदीर येथे आलो.हे मंदीर हेमांड पंथी असावे, असे येथील बांधकामांवरून वाटते.मंदिराच्या आवारात आम्हाला काही वीरगळ नजरेस पडल्या.राहुल(रायबा) ने आम्हाला या वीरगळ विषयी माहिती दिली.या सर्व अपरिचित स्थळांना आम्हि भेटी देऊन परतीच्या प्रवासास निघालो.
आपण प्रत्येकाने या स्थळांना अवश्य भेट द्यावी.आमच्या दृष्टीने हे अपरिचित ठिकाण आहे , काहींनी हे पाहिले ही असतील.परंतु बऱ्याच जणांनी या ठिकाणी भेट दिली नसावी, असे आम्हाला वाटते.