Friday, 29 March 2024

"वाघ" म्हणतात धनगर जातीला

"वाघ" म्हणतात धनगर जातीला ।।कपाळी लावतो महाराष्ट्रा च्या मातीला ।।डोंगराशी भिडवतो छातीला ।।तोड नाही जगात कुठेआमच्या हिम्मतीला ।।आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।।कारण पुजतो फक्त।। "छत्रपती शिवराय, मल्हारराव  आणि शंभूराजे यांना" ।।हाती काठी पाठीशी घोंगडं,काखेत झोळी कपाळी भंडार, डोंगर दर्या तुडवतो हा वाघ, सोबती त्याच्या मेंढरं,....असा हा माझा धनगर उन्हा थंडीत, पावसातं, रक्षण करे आपुल्या लेकरांचं, मनी नाही त्याच्या दुराभावं, निसर्गाचेही करीतो रक्षण,...असा हा माझा धनगर वेळ आली आणिबाणीची, झाले राज्यकर्ते अन मायबाप,अवघ्या विश्वाचा केला उद्धार,चालविली भाला अन तलवार,....अशी ही माझी धनगरमाता आमची अहिल्या होळकर, सकळ रयतेचा उद्धार,महिलांना दिले शिक्षण व संरक्षण,सगळी प्रजा नांदवीली सुखात,...असा हा माझा धनगर जागवा पुन्हा तो इतिहास,अन इतिहास रचन्यास सज्ज माझा धनगर,...अश्या ह्या माझ्या धनगर समाजाचे भक्त आम्ही ,मरणाला घाबरणार नाही , छत्रपती शिरायांचे आणि होळकरांचे मावळे आम्ही ,मोडू पण वाकणार नाही , धनगराचे रक्त आमचे ,घात कधी करणार नाही आणि जर आमचा घात कोणी केला तर "अहिल्याची शपथ "घेऊनसांगतो उभा चिरेण पण नाही सोडणार ……।|| जय शिवराय ||। जय अहिल्या||। अभिमान मानतो जातीला.....स्वाभिमानजाणतो मातीला......प्राणतलवारीच्या पातीला.....आम्ही देवसमजतो....पुण्यश्लोकराजमाता महाराणी अहिल्यादेवीला।।एक आवाज एकच पर्याय...! : भावा मी धनगर आहे...... चुकलं असेल काही तर चिडुनकोस अन्.....शहाणा असशील तर कधी नडुनकोस........आमच्या मनात जे असते तेचआमच्या ओठावर असते......म्हणुन तर धनगराच्या पोरांच्या छातीवरचे पहिले बटण उघडे असते .......शेर की झलक,सबसे अलग।।जय मल्हार जय अहिल्या।।
"लढण्याचा इतिहास आमचा 
हरणे माझ्या रक्तात नाही 
जोवर मैदानात उभा मी 
जिंकणे नियतीला शक्य नाही "

महिलादिनानिमित्त

समतोल ह्या जगाचा तूच  बांधून ठेवतेस
तरी जल्लोष होत नाही कुठे तुझा
दुःखाने होते स्वागत तुझे
का हट्ट करतेस ह्या भुतळावर जन्मायचा

नावाला असतात फक्त 
'बेटी बाचाओ ' चे बहाने
बाकी मनातल्या मनात 
नुसतेच असते कन्हणे

एका  गोंडस मुली पासून 
सरणा पर्यंतचा खडतर प्रवास तुझा
काही झालं तरी वेदना
अटळ असतात  तुझ्या

कमी पडतोय रे तिच्या समोर 
ह्या प्रकृतीचा विधाता
चालवत आहे वर्षांनुवर्षे
मायेचा ती जाता

तिच्या खेळकर वयातच देव 
मोठेपण आंदण देण्याचा करतोय  गुन्हा 
कुठल्या जन्माचा सुड उगवतो
भातकुलीचा डाव मोडतो पुन्हा पुन्हा

कोवळ्या वयात आलीस
की झेलाव्या लागतात नराधामांच्या नजरा
त्याग आणि बांधिलकीचा
सहज माळतेस गाजरा


ठेवते जोडुन साऱ्यांना
 बांधून एक राखी 
नकार असोत कितीही 
तरी ही होतेस तू सखी

शिकलीस तर शिकलीस
नाहीतर चुली पुढे रांधलीस
ह्या रुढीला जागून आता
तू अंतराळाला गवसणी घातलीस

हुंड्याची बेडी घालून 
तू लग्नसोहळ्यात उभी राहिलीस
स्वतः च कारावास भोगत
तू शिक्षा बापाला ही दिलीस

कायदे किती ही कठीण झाले 
तरी समाज लांच्छनास्पद राहील
तिटकारा होत राहील स्त्रिजातीचा
अधोगतीला नेण्याची नामीसंधी तो शोधील

आता काळ नाही तर वेळ बदलावा लागेल
स्त्रीच्या मागे आता स्त्रीनेच उभ रहाव लागेल
जिद्दीने संकटावर मात करावी लागेल.
तुझ्या जगण्याची वाट आता तुलाच शोधावी लागेल.

हे नशिबा

हे नशिबा तू किती पण पलीकडे बघ
शेवटी तुला माझ्या कडेच
बघाव लागणार माझ्या मेहनती पोटी ...

हे नशिबा तू किती पण अबोल रहा
तुला शेवटी माझ्याशी
बोलावंच लागणार माझ्या स्वप्नांसाठी ...

हे नशिबा तू किती पण एकट रहा
तुला शेवटी माझ्या सोबत
राहावं लागणार माझ्या जिद्दी पोटी 

हे नशिबा तू किती पण रडत रहा
तुला शेवटी हसावं
लागणार आपल्या यशासाठी ...

हे नशिबा तू किती पण अलग रहा
तुला शेवटी माझीच
मिठ्ठी खूप आहे आयुष्य बदलण्यासाठी 

स्फूर्ती देणारी चारोळी

"लढण्याचा इतिहास आमचा 
हरणे माझ्या रक्तात नाही 
जोवर मैदानात उभा मी 
जिंकणे नियतीला शक्य नाही."

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं*शुभ सकाळ मित्रांनो

निवांत झाल्यावर नक्की वाचा...🙂🙂🙂आयुष्य कठीण अजिबात नसतं . . कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . . कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . . कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . . कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . . कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . . कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . . कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . . कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . . कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . . कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . . कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . . कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . . कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो . . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?? ताण घेतला तर तणाव . . आजचे भागले म्हणून आनंद आणिउद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते . आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......*या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं*शुभ सकाळ मित्रांनो