आपल्या गावच्या हिताच्या आपल्या गावातील सुधारणेच्या गावातील तरुण मुलांसाठी काही नाविन्यपूर्ण प्रगतीला पूरक असे काही शेअर करता आले तर करूया
काळ बदलत चालला आहे खूप स्पर्धा वाढत चालल्या आहेत
पूर्वी मित्रांनो चांगल्या संध्या खूप मिळायच्या त्यामुळे मूल वाईट वळणावर कमी जात होती
मात्र याउलट आता संधी फक्त एकदाच दार ठोठावते परत ती ढुंकून ही बघत नाही
म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करा
हे अनुभवाचे बोल आहेत
मी फक्त माझं मत मांडले आहे आपन आपला विचार करावा आणि चला आपण आपल्या सर्वांना अधोगतीतून वर काढुया या नाकारात्म जगातून आपल्या या पिढीला बाहेर काढुया
तुम्ही कधी पाहिलत का मारवाडी (जैन) समाजातील माणसांना आहो अक्षरशः त्यांच्या समाजातील एखाद्या माणसाकडे काहीच नसत माझ्या समोरची उदाहण आहे एका मेडिकल मध्ये नोकराच काम करणारा मनुष्य आता दोन किराणा माल दुकानाचा मालक आहे
आपण फक्त म्हणतो त्यांनीच धंदा करावा कारण त्यांना त्यांच्या माणसांची शक्ती रुपी साथ असते ती आपल्या मराठी माणसांमध्ये नाही
म का नाही आपण ही आपल्या मंडळा च्या माध्यमातून असं काही करू शकत
आपण काय म्हणतो की आपली माणस म्हणजे मेंढरं हो हो बरोबर पण मेंढरं पण सजीवच होती ना आपण ही सजीवच आहोत ना म आपल्याला बदलत आलं पाहिजे
आपण का नाही बदल स्वीकारत
आपण बदलूया आपली पुढची पिढी आपोआप आपल्या अनुकरणातून बदलणार
हे दावे मान अपमान मला मान द्या याने जीवन सार्थ होत नाही हीच प्रथा आपल्या ला बदलायची आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन सर्व समानतेने आपल्याला जागाच म्हणण्यापेक्षा सोबत जगवायच आहे
आता आपण सगळे सुज्ञ आहोत चांगलं काय वाईट काय या सर्व गोष्टी आपल्याला समजतात
चला आता आपन जागे होऊया आणि एक पाऊल आपल्या गावातील भावी पिढीच्या प्रगतीच्या सकारात्मक दृष्टीने टाकूया.
आपुलकीची तळमळ श्रीकांत एस. के.
No comments:
Post a Comment