Sunday, 22 September 2024

खूप काही कमवून खूप काही गमावणे

खूप काही कमवून खूप काही गमावले आहे असे जेव्हा आपल्याला वाटायला लागते तेव्हा समजून जायचे की या कमावण्याच्या नादात मी माणूस म्हणून जगणं विसरून गेलो होतो. आणि अता माणूस म्हणून जेव्हा जगावस वाटत आहे तेव्हा माझं म्हणून कोणीच जवळ नाही. 
               त्यामुळे मित्रांनो खुप कमवा खूप मोठे व्हा पण हे सर्व करत असताना आपल्यातला माणूस मात्र हरवू नका. कामाच्या व्यापात,कमावण्याच्या नादात, धकाधकीच्या या दुनियेत आपल्या माणसांना विसरू नका, त्यांना डावलू नका कारण ज्यावेळी तुमच्याकडे खूप वेळ असेल तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा ते नसतील देखील...... एखाद्या वेळी गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ आणि गेलेली माणसं पुन्हा कधीच मिळवता येत नाही. या गोष्टीची जाणीव निश्चितच आपल्या मनात रुजावी म्हणून हे लिहिले आहे. 
                             लेखक :-  श्री. श्रीकांत सदाशिव खताळ 
           

No comments:

Post a Comment