आपण सातत्याने म्हणत असतो की, या मोबाईल चा शोध लागला आणि पिढी बरबात झाली. खरच का......... याबाबतीत मला असे वाटते की, बघा हा पहिले लोकांच्या गरजा कमी होत्या. तसेच लोक जे काही *लिमिटेड* मिळायचे त्यात सुखी होते कारण मुळात *गरजा लिमिटेड* होत्या. आता लोकांना *इनकम अनलिमिटेड* हवे आहे. म्हणून लोक एका कामावर स्थिर नाहीत. एका सोबत अनेक धंदे करतात. त्यामुळे मुलांना वेळ देणे तसे शक्य होणार नाही. म्हणून *ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असावे समाधानी* असे म्हणून या काळात चालेल का. नाही चालणार त्यामुळे बदलत्या काळानुसार आपल्याला बदलणे गरजेचे आहे. जर देशाला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे तर स्वतः ला तेवढेच *अपग्रेड* करण गरजेचे आहे.
बर आपल्या काळात ही बरेचसे *खेळ* होते, *एकत्र कुटुंब पद्धती* होत्या, *आजी आजोबा* लहान मुलांना *इतिहासातील* , *देवदेवातांच्या कथा* सांगायचे, *आई वडील* मुलांना *समाजात* *कसे वागावे* याचे ज्ञान द्यायचे त्यामुळे मुलांमध्ये *संस्कार* घडायचे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे घडलो. *बर आपण आपल्या आजी आजोबांन सारखे, आई वडिलांसारखे वागतो का. तर बिलकुल नाही* तुमच्याकडे तुमचा मुलगा आला काही बोलायला की आपण मोबाईल मध्ये फालतु गोष्टीत वेळ घालवत असतो. आईकडे गेले तर आई पण मोबाईल मध्ये बिझी. मग त्या मुलाने कोणाचा आधार घ्यायचा. मग तो पण मोबाईल नाहीतर टीव्ही बघत बसतो. मग तो काय बघतोय त्यावर याकडे आपले लक्ष नसते. आपल्याला एवढेच वाटते की शांत बसलाय ना मग ठीक आहे बसुदे. आणि तो मुलगा किंवा मुलगी वाया गेली की आपण नाव ठेवणार त्या मोबाईल ला. *वाटोळं केले या मोबाईल ने या पिढीचे.* खर तर वाक्य पूर्ण पणे चुकीचे आहे. *वाटोळं केले आपण स्वतःच या पिढीचे.* कारण ज्या वयात मुलांना वेळ द्यायची गरज असते त्या वेळी आपण स्वतः मोबाईल मध्ये वेळ घालवला. आणि आता वेळ निघून गेल्यावर काय हो करणार.मनुष्य गुणांधर्मा प्रमाणे प्रगती पथावर असताना मीडिया ला नावे ठेवणे.
अहो ज्या प्रमाणे *चिखल जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित आकार देता येतो.* एकदा का *चिखल सुकला की त्याला व्यवस्थित आकार देता येत नाहीत.* त्यामुळे देशाची प्रगती होत असताना असे बदल होत राहणार. विचार आपण असा करायचा की, यातील *चांगले काय आणि वाईट काय* ते आपल्या *पिढीला शिकवाचे.* बघा मग होत असलेला बदल सुद्धा मुलांमध्ये *उत्तम संस्कार* घडवून जाईल. *नावीन्यपुर्ण टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आपण ही करावा आणि आपल्या मुलांना ही तो शिकवावा. बघा मुलं बिलकुल वाया जाणार नाहीत आणि आणि आपली संस्कृती ही टिकून राहील.*
म्हणून म्हणतात ना तूच आहॆस तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे अगदी खरे आहे.