Sunday, 22 September 2024

मुलांच्या प्रगतीमधील नक्की अडथळा कोण आहे?

आपण सातत्याने म्हणत असतो की, या मोबाईल चा शोध लागला आणि पिढी बरबात झाली. खरच का......... याबाबतीत मला असे वाटते की, बघा हा पहिले लोकांच्या गरजा कमी होत्या. तसेच लोक जे काही *लिमिटेड* मिळायचे त्यात सुखी होते कारण मुळात *गरजा लिमिटेड* होत्या. आता लोकांना *इनकम अनलिमिटेड* हवे आहे. म्हणून लोक एका कामावर स्थिर नाहीत. एका सोबत अनेक धंदे करतात. त्यामुळे मुलांना वेळ देणे तसे शक्य होणार नाही. म्हणून *ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असावे समाधानी*  असे म्हणून या काळात चालेल का. नाही चालणार त्यामुळे बदलत्या काळानुसार आपल्याला बदलणे गरजेचे आहे. जर देशाला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे तर स्वतः ला तेवढेच *अपग्रेड* करण गरजेचे आहे.

बर आपल्या काळात ही बरेचसे *खेळ* होते, *एकत्र कुटुंब पद्धती* होत्या, *आजी आजोबा* लहान मुलांना *इतिहासातील* , *देवदेवातांच्या कथा* सांगायचे, *आई वडील* मुलांना *समाजात* *कसे वागावे* याचे ज्ञान द्यायचे त्यामुळे मुलांमध्ये *संस्कार* घडायचे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे घडलो. *बर आपण आपल्या आजी आजोबांन सारखे, आई वडिलांसारखे वागतो का. तर बिलकुल नाही* तुमच्याकडे तुमचा मुलगा आला काही बोलायला की आपण मोबाईल मध्ये फालतु गोष्टीत वेळ घालवत असतो. आईकडे गेले तर आई पण मोबाईल मध्ये बिझी. मग त्या मुलाने कोणाचा आधार घ्यायचा. मग तो पण मोबाईल नाहीतर टीव्ही बघत बसतो. मग तो काय बघतोय त्यावर याकडे आपले लक्ष नसते. आपल्याला एवढेच वाटते की शांत बसलाय ना मग ठीक आहे बसुदे. आणि तो मुलगा किंवा मुलगी वाया गेली की आपण नाव ठेवणार त्या मोबाईल ला. *वाटोळं केले या मोबाईल ने या पिढीचे.* खर तर वाक्य पूर्ण पणे चुकीचे आहे. *वाटोळं केले आपण स्वतःच या पिढीचे.* कारण ज्या वयात मुलांना वेळ द्यायची गरज असते त्या वेळी आपण स्वतः मोबाईल मध्ये वेळ घालवला. आणि आता वेळ निघून गेल्यावर काय हो करणार.मनुष्य गुणांधर्मा प्रमाणे प्रगती पथावर असताना मीडिया ला नावे ठेवणे.

अहो ज्या प्रमाणे *चिखल जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित आकार देता येतो.* एकदा का *चिखल सुकला की त्याला व्यवस्थित आकार देता येत नाहीत.* त्यामुळे देशाची प्रगती होत असताना असे बदल होत राहणार. विचार आपण असा करायचा की, यातील *चांगले काय आणि वाईट काय* ते आपल्या *पिढीला शिकवाचे.* बघा मग होत असलेला बदल सुद्धा मुलांमध्ये *उत्तम संस्कार* घडवून जाईल. *नावीन्यपुर्ण टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आपण ही करावा आणि आपल्या मुलांना ही तो शिकवावा. बघा मुलं बिलकुल वाया जाणार नाहीत आणि आणि आपली संस्कृती ही टिकून राहील.*

म्हणून म्हणतात ना तूच आहॆस तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे अगदी खरे आहे. 

गणपती बाप्पाचे विसर्जन की विटंबना

तमाम गणेश भक्तांना, तसेच सर्व गणेश मंडळाना माझी नम्रतेची विनंती आहे. जर तुम्हाला आपल्या देवतांचे पावित्र्य जपता येत नसेल तर मनोरंजन म्हणून गणपती बाप्पा ची स्थापना करू नका. आपले देवी देवता म्हणजे खेळण्यातील मनोरंजनाचे साधन नाहीत. कोणी दीड दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस तर कोणी 21 दिवस गणपती बाप्पा ची स्थापना करून मनोभावे सेवा करता तसेच गणपती बाप्पा कडे विघ्न दूर करण्याची, स्वतः च्या भरभराटीची मागणी करता. आणि विसर्जना दिवशी घरात भावुक होऊन निरोप देता. हाच भावुक पणा गणपती बाप्पा ला नाल्यात, डबक्यात, तलावात, नदीत, समुद्रात विसर्जन करताना आपल्या गणरायाचे कोणतेही पावित्र्य न जपता अक्षरशः वरून कचऱ्याप्रमाणे फेकून देता. एवढा ढोंगीपणा. कुठे फेडाल हे पाप. आणि कोणत्या तोंडाने बोलता रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्यावर्षी लवकर या. कशाला पुन्हा स्वतः ची विटंबना करून घ्यायला. रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाला आणि आपल्याला ते हात पाय तुटलेले बघायला भेटले तर आपली हळहळ होते. त्या व्यक्तीविषयी मनामध्ये अक्षरशः तळमळ निर्माण होते. आणि अश्या विचित्र प्रकारे गणपती बाप्पा चे विसर्जन करतोस तेव्हा आपल्या देवाचे हात पाय मस्तक तुटलेलं पाहून तुझं काळीज तुटत नाही का रे. आपल्या लेकरासाठी खुप सारे आशीर्वाद ज्या देवाकडे मागतोय त्याच लेकराला थोड खरचटलं तरी जीव आपला कासावीस होतो. इथे त्याच देवाचे अवशेष वेगवेगळे होताना दिसतात तेव्हा तुझं मन हलत नाही का रे. कोणत्या तोंडाने देवाला वरदान मागतोस. आज स्वतः च्या मुलाला असे कसे ही पडताना पाहून त्या गणराया च्या वडिलांना आईला म्हणजेच सृष्टी निर्माते महादेव, महामाया सर्वांची जननी, अन्नपूर्णा माता पार्वतीला काय वाटत असेल. आठवा पौराणिक कथा ज्या वेळी आपल्या मुलाची मान महादेवाच्या हातून उडवली गेली तेव्हा त्या आईने महा भयंकर रुप धारण केले होते. पूढे काय घडले हे आपल्या सर्वांनाच ज्ञातच आहे. नका वाट पाहू त्या माऊलीच्या क्रोधाची. जर त्या माऊलीने जर अक्रार विक्राळ रुप घेतले तर विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असे समजा त्या माऊलीने त्या आईने आपल्याला सुधारण्याची एक साधी दिली आहे. एक लक्षात ठेवा आपणच जर आपल्या देवतांचे पावित्र्य नाही राखले तर आपण इतर धर्मातील लोकांनी आपल्या धर्माचे पावित्र्य राखावे अशी अपेक्षाच का करता. 
आणि त्यामुळे माझी सर्व गणेश भक्तांना, आणि सर्व गणेश मंडळाना नम्र पूर्वक विनंती आहे की,पुढच्यावर्षी पासुन आपण सर्व इकोफ्रेंडली गणपती बसवू आणि  आपल्या देव देवतांचे पावित्र्य आपणच राखूया. इकोफ्रेंडली गणपती घेतल्याने त्याचे विटंबन होत नाही ते लगेचच पाण्यामध्ये विरघळून जातात. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखले जाते. 
विचार करा नक्कीच मित्रांनो. मी तर म्हणतो पुढच्यावर्षी चे नियोजन याच वर्षी करा आणि आपण ज्या मूर्तिकाराकडून मूर्ती घेतो त्याला याच वर्षी सांगा की माझी पुढच्यावर्षी मूर्ती ही शाडूच्या मातीचीच असणार. आणि उंची देखील उगाजच एवढव्या नसणार. बघा किती बदल होईल निसर्गात देखील. नक्कीच गणराय आपल्याला उत्तम वरदान देतील. आणि आता जो आपला धर्म आपल्या चुकीमुळे संकटात आहे तो संकटातून मुक्त करेल. तोच योग्य दिशा देईल असा माझा माझ्या गणरायाप्रती विश्वास आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी नक्कीच लवकर या आम्ही तुमचे स्वागत ज्या प्रमाणे शास्त्रशुद्ध करतो तसेच विसर्जन देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने करू. 


खूप काही कमवून खूप काही गमावणे

खूप काही कमवून खूप काही गमावले आहे असे जेव्हा आपल्याला वाटायला लागते तेव्हा समजून जायचे की या कमावण्याच्या नादात मी माणूस म्हणून जगणं विसरून गेलो होतो. आणि अता माणूस म्हणून जेव्हा जगावस वाटत आहे तेव्हा माझं म्हणून कोणीच जवळ नाही. 
               त्यामुळे मित्रांनो खुप कमवा खूप मोठे व्हा पण हे सर्व करत असताना आपल्यातला माणूस मात्र हरवू नका. कामाच्या व्यापात,कमावण्याच्या नादात, धकाधकीच्या या दुनियेत आपल्या माणसांना विसरू नका, त्यांना डावलू नका कारण ज्यावेळी तुमच्याकडे खूप वेळ असेल तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा ते नसतील देखील...... एखाद्या वेळी गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ आणि गेलेली माणसं पुन्हा कधीच मिळवता येत नाही. या गोष्टीची जाणीव निश्चितच आपल्या मनात रुजावी म्हणून हे लिहिले आहे. 
                             लेखक :-  श्री. श्रीकांत सदाशिव खताळ 
           

Friday, 29 March 2024

"वाघ" म्हणतात धनगर जातीला

"वाघ" म्हणतात धनगर जातीला ।।कपाळी लावतो महाराष्ट्रा च्या मातीला ।।डोंगराशी भिडवतो छातीला ।।तोड नाही जगात कुठेआमच्या हिम्मतीला ।।आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।।कारण पुजतो फक्त।। "छत्रपती शिवराय, मल्हारराव  आणि शंभूराजे यांना" ।।हाती काठी पाठीशी घोंगडं,काखेत झोळी कपाळी भंडार, डोंगर दर्या तुडवतो हा वाघ, सोबती त्याच्या मेंढरं,....असा हा माझा धनगर उन्हा थंडीत, पावसातं, रक्षण करे आपुल्या लेकरांचं, मनी नाही त्याच्या दुराभावं, निसर्गाचेही करीतो रक्षण,...असा हा माझा धनगर वेळ आली आणिबाणीची, झाले राज्यकर्ते अन मायबाप,अवघ्या विश्वाचा केला उद्धार,चालविली भाला अन तलवार,....अशी ही माझी धनगरमाता आमची अहिल्या होळकर, सकळ रयतेचा उद्धार,महिलांना दिले शिक्षण व संरक्षण,सगळी प्रजा नांदवीली सुखात,...असा हा माझा धनगर जागवा पुन्हा तो इतिहास,अन इतिहास रचन्यास सज्ज माझा धनगर,...अश्या ह्या माझ्या धनगर समाजाचे भक्त आम्ही ,मरणाला घाबरणार नाही , छत्रपती शिरायांचे आणि होळकरांचे मावळे आम्ही ,मोडू पण वाकणार नाही , धनगराचे रक्त आमचे ,घात कधी करणार नाही आणि जर आमचा घात कोणी केला तर "अहिल्याची शपथ "घेऊनसांगतो उभा चिरेण पण नाही सोडणार ……।|| जय शिवराय ||। जय अहिल्या||। अभिमान मानतो जातीला.....स्वाभिमानजाणतो मातीला......प्राणतलवारीच्या पातीला.....आम्ही देवसमजतो....पुण्यश्लोकराजमाता महाराणी अहिल्यादेवीला।।एक आवाज एकच पर्याय...! : भावा मी धनगर आहे...... चुकलं असेल काही तर चिडुनकोस अन्.....शहाणा असशील तर कधी नडुनकोस........आमच्या मनात जे असते तेचआमच्या ओठावर असते......म्हणुन तर धनगराच्या पोरांच्या छातीवरचे पहिले बटण उघडे असते .......शेर की झलक,सबसे अलग।।जय मल्हार जय अहिल्या।।
"लढण्याचा इतिहास आमचा 
हरणे माझ्या रक्तात नाही 
जोवर मैदानात उभा मी 
जिंकणे नियतीला शक्य नाही "

महिलादिनानिमित्त

समतोल ह्या जगाचा तूच  बांधून ठेवतेस
तरी जल्लोष होत नाही कुठे तुझा
दुःखाने होते स्वागत तुझे
का हट्ट करतेस ह्या भुतळावर जन्मायचा

नावाला असतात फक्त 
'बेटी बाचाओ ' चे बहाने
बाकी मनातल्या मनात 
नुसतेच असते कन्हणे

एका  गोंडस मुली पासून 
सरणा पर्यंतचा खडतर प्रवास तुझा
काही झालं तरी वेदना
अटळ असतात  तुझ्या

कमी पडतोय रे तिच्या समोर 
ह्या प्रकृतीचा विधाता
चालवत आहे वर्षांनुवर्षे
मायेचा ती जाता

तिच्या खेळकर वयातच देव 
मोठेपण आंदण देण्याचा करतोय  गुन्हा 
कुठल्या जन्माचा सुड उगवतो
भातकुलीचा डाव मोडतो पुन्हा पुन्हा

कोवळ्या वयात आलीस
की झेलाव्या लागतात नराधामांच्या नजरा
त्याग आणि बांधिलकीचा
सहज माळतेस गाजरा


ठेवते जोडुन साऱ्यांना
 बांधून एक राखी 
नकार असोत कितीही 
तरी ही होतेस तू सखी

शिकलीस तर शिकलीस
नाहीतर चुली पुढे रांधलीस
ह्या रुढीला जागून आता
तू अंतराळाला गवसणी घातलीस

हुंड्याची बेडी घालून 
तू लग्नसोहळ्यात उभी राहिलीस
स्वतः च कारावास भोगत
तू शिक्षा बापाला ही दिलीस

कायदे किती ही कठीण झाले 
तरी समाज लांच्छनास्पद राहील
तिटकारा होत राहील स्त्रिजातीचा
अधोगतीला नेण्याची नामीसंधी तो शोधील

आता काळ नाही तर वेळ बदलावा लागेल
स्त्रीच्या मागे आता स्त्रीनेच उभ रहाव लागेल
जिद्दीने संकटावर मात करावी लागेल.
तुझ्या जगण्याची वाट आता तुलाच शोधावी लागेल.

हे नशिबा

हे नशिबा तू किती पण पलीकडे बघ
शेवटी तुला माझ्या कडेच
बघाव लागणार माझ्या मेहनती पोटी ...

हे नशिबा तू किती पण अबोल रहा
तुला शेवटी माझ्याशी
बोलावंच लागणार माझ्या स्वप्नांसाठी ...

हे नशिबा तू किती पण एकट रहा
तुला शेवटी माझ्या सोबत
राहावं लागणार माझ्या जिद्दी पोटी 

हे नशिबा तू किती पण रडत रहा
तुला शेवटी हसावं
लागणार आपल्या यशासाठी ...

हे नशिबा तू किती पण अलग रहा
तुला शेवटी माझीच
मिठ्ठी खूप आहे आयुष्य बदलण्यासाठी 

स्फूर्ती देणारी चारोळी

"लढण्याचा इतिहास आमचा 
हरणे माझ्या रक्तात नाही 
जोवर मैदानात उभा मी 
जिंकणे नियतीला शक्य नाही."

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं*शुभ सकाळ मित्रांनो

निवांत झाल्यावर नक्की वाचा...🙂🙂🙂आयुष्य कठीण अजिबात नसतं . . कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . . कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . . कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . . कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . . कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . . कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . . कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . . कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . . कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . . कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . . कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . . कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . . कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो . . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?? ताण घेतला तर तणाव . . आजचे भागले म्हणून आनंद आणिउद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते . आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......*या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं*शुभ सकाळ मित्रांनो