Monday, 20 March 2017

बदल

आयुष्यात ज्याला बदल स्वीकारायची तयारी नसते ती व्यक्ती कधी पुढे आणि सकारात्मक विचार नाही करू शकत
परंतु बदलत्या काळानुसार व्यतिने जर बदल स्वीकार केला तर प्रगती निश्चित आहे यालाच सकारात्मक विचार करणे म्हणतात

या बाबतीत ल मी शिवाजी महाराजांचं एक उदाहणर देऊ इच्छितो

शिवरायांना राजकुवर राजाराम जन्माला आले सर्व खुश झाले तेवढेच सर्व जण चिंतेत पण होते कारण राजाराम पालथे जन्माला आले होते लोकांचे जुने समज कि पालथं जन्माला येन चांगलं नसत

माँ साहेब महाराजांकडे गेल्या  आणि म्हणाल्या राजे राजकुवर जन्माला आले पण पालथे आले

कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शिवराय पटकन म्हटले वा बहुत खूब राजकुवर पालथे जन्माला आले आता दिल्ली पालथी घालणार

बघितलेत याच वैचारिक धोरणामुळे शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले यामुळेच माणसं जोडू शकले ते स्वतः च सकारात्मक होते असे नाही त्यांनी त्यांच्या मावळ्यांना पण तेवढंच सकारत्मक बनवलं होत म्हणून तर म्हणतात ना शिरायांनी जातीसाठी नव्हे तर मातीसाठी रयतेच्या स्वराज्यासाठी माणसं तयार केली बांडगुळाच जीवन जगणाऱयांसारखी नाही लढणारी मांणस तयार केली रडणारी नाहीत

याला म्हणतात सकारात्मक विचारश्रेणी बदल स्वीकारता आला पाहिजे तरच जीवन जगण्यात मजा आहे अन्यथा ती स्वतः स्वतःला लावून घेतलेली सजा आहे

No comments:

Post a Comment