नियतीच्या विळख्यातून स्वताची सुटका करून घेत शाहू स्वगृही आले., १२ जानेवारी १७०८ रोजी शाहूमहाराज सातारच्या किल्ल्याला राजधानीचा मान देत छत्रपती जाहले., शाहूंचा राज्याभिषेक करून घेत आपण सत्तेवर आल्याची द्वाही फिरविली.
पत्राद्वारे अधिकृतरीत्या या गोष्टीच्या बातम्या सगळीकडे धाडण्यात आल्या., एक पत्र किनारपट्टीवरील पोर्तुगीजांना – गोव्याच्या व्हिसेरेइलाही पाठविले परंतु अभिनंदन गोष्टींची साधारण औपचारिकता देखिल मगरूरीच्या कैफात असणाऱ्या पोर्तुगीजांना निभावता आली नाही. १७०८ साली कोकणातील रांगणा किल्ल्यावर असताना हिंदुपती शाहूंना परिसरातील पुष्कळ लोक भेटावयास आले, पण पोर्तुगीजांनी येथे देखील आडमुठेपण केला., हि गोष्ट छत्रपतींना खटकली आणि बाळाजी महादेव नावाचा एका दूतास पत्र घेऊन गोव्याकडे रवाना केले.
“मी सैन्यासह कोकणात आल्याची बातमी तुम्हाला कळून देखील माझ्या स्वागतासाठी तुम्ही आला नाहीत, हे मराठा-पोर्तुगीज संबंधाच्या विरोधात आहे. तुम्हीं तुमचा एक वकील नजराणा घेऊन आम्हा मराठ्यांच्या दरबारात पाठवावा”
अशा आशयाचा हा खलिता होता शिवाय काही मागण्या छत्रपती शाहूंनी केल्या होत्या त्यातील एक मागणी म्हणजे “डिचोली महालात येणाऱ्या खोज्रुवे आणि पानेली हि बेटे परत मराठ्यांच्या स्वाधीन करावी.
एकदा जिभेला रक्ताची चटक लागली कि, जनावराचे हिंस्त्रपण वाढते, तसेच विस्तारवादी विचारांचा पगडा एखाद्यावर पडला कि त्याचे वर्णन सुद्धा महत्वकांक्षीच ठरते. आणि हेच पोर्तुगीजांच्या बाबतीत घडले. आणी हीच बेट वादाची ठिणगी ठरली, शाहूपर्वात आलेला हा मराठा-पोर्तुगीजांचा संबंध. इथपासून हि धुसपूस सुरु झाली. यावेळी आंग्रे ताराराणी पक्षाशी एकनिष्ठ होते, पण समुद्रावर निरंकुश सत्ता गाजवतचं होते आणि ताराराणी पक्षाशी एकनिष्ठ होते, पुढे ते शाहूंच्या कृपाभिलाषी झाले आणि, मराठेशाहीची ताकद कैकपटींनी वाढली.
या आधी कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीज इंग्रज यांच्या नाकी दम आणला होता., त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांनी, संयुक्तीतपणाने मराठ्यांवर हि मोहीम काढली., लढाईला उतरण्याआधीचं त्यांनी प्रदेशाची आपसात वाटणी ठरवून घेतली होती. डिसेंबर १७२१ मध्ये या मोहिमेला सुरवात झाली. तेव्हा, कान्होजींच्या मदतीला छत्रपतींनी बाजीरावास धाडले., यामुळे बलवान आंग्रे आणखी मस्तवाल झाले., आता मराठ्यांशी लढणे म्हणजे जुगार होऊन बसला होता “आया तो अपना गया तो सपना” कारण शाहू छ्त्रपतींशी लढणे म्हणजे सबंध हिन्दुस्थानाशी लढणे ऐसे होऊन बसले होते. त्यात याच शाहूराजांच्या पित्यानं आपल्यावर केलेली मोहीम पोर्तुगीज आजतागायत विसरले नव्हते. मराठ्यांच्या येऊ घातलेल्या या सेना सागरामुळे व्हिसेरेइलाही हा तर पार आजारी पडला.
आपली ध्वजनौका युद्धक्षेत्राच्या बाहेर न्हेऊन समुद्रात दूरवर न्हेऊन उभी केली. आणि पुढे बाजीरावाशी हे युद्ध सामोपचाराने मिटवते घेतले.
हे अरिष्ट पार पडले तरी आपल्या दरबारातील वकिलाची मागणी अजून पोर्तुगीजांनी पूर्ण केली नव्हती. याचे कारण म्हणजे मोगल बादशहाचे मांडलिक असणाऱ्या शाहूंच्या दरबारी पोर्तुगाल सारख्या सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्राने मराठा दरबारी वकील पाठविणे पोर्तुगालच्या दृष्टीने कमी प्रतिष्ठेचे होते,
पण तत्कालीन हिन्दुस्थानहा साताऱ्याच्या राजवाड्यातूचं हाकला जायचा, सह्याद्रीत उठून गायब होणाऱ्या वावटळीनिशी एखाद्या ठिकाणचे राजकारण रंग बदलत असते
त्यात हिंदू धर्मियांचे पोर्तुगीज मिशनरी कडून होणारे सक्तीने धर्मांतर हा सुद्धा मुद्दा होताचं याचीच परिणीती पुढे युद्धात झाली. मराठ्यांशी लढण्यासाठी इंग्रज, पोर्तुगाल, फ्रेंच, डच विविध युत्या आघाड्यांची चाचपणी चालू झाली पण मराठ्यांना उघडपणाने सामोरे जाण्याचे धैर्य मुळातचं कुणाकडे उरले नव्हते. “अवघा हिंदोस्ता आपल्या बलदंड बाहूत तोलण्यासाठी एकटे शाहूच समर्थ होते” मुंबई पासून गोव्यापर्यंत पोर्तुगीजांविरुद्ध युद्ध आघाड्या उघडल्या गेल्या होत्या. वसई किल्ल्याचे प्रकरण सुद्धा यातीलचं एक. पण काही केल्या मराठा दरबारी वकील पाठविण्यास पोर्तुगाल तयार नव्हताचं
मराठ्यांनी केलेल्या प्रखर लढ्यात वसई किल्ल्याचे भिताड ढासळले आणि पोर्तुगीजांचा माजसुद्धा,
वसईमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एकूण जीवांची संख्या साधारण २३ ते २५ हजारात भरत होती., या वसई लढ्यातूनच उद्भवलेल्या गोव्याच्या युद्धातून, गोव्याचे सरकार दिवाळखोर बनले. जवळपास ४० लाखांची हानी झाली. ५९३ तोफा पोर्तुगीजांनी गमविल्या, यात लांब पल्ल्याच्या ब्रांझच्या तोफा अधिक. ३४ लाख अश्राफिंची धूळधाण झाली. ठाणे जिल्याद्तील वर्सोवापासून दमणपर्यंतच्या सलग चोवीस कोस लांबीच्या ३४० खेडी असलेल्या प्रदेशावर पोर्तुगालला पाणी सोडावे लागले. वसईसारखा बलाढ्य किल्ला आणखी छोटेमोठे वीस किल्ले, आठ शहरे, दोन तटबंदीच्या टेकड्या ठाणे शहराश साष्टी बेट मराठ्यांच्या हवाली करावे लागले. सागरी सत्ता म्हणून असणारा पोर्तुगालचा मोठ्या प्रमाणावरला दबदबा मराठ्यांनी पार डबघाईला आणला., नामुष्कीची गोष्ट हि की, छत्रपती शाहूंच्या, मराठ्यांच्या दरबारात पोर्तुगालला आपला वकील पाठवावा लागला
उत्तर हिंदुस्थानात एकीकडे मराठेशाहीचे ध्वज नाचत असताना, सबंध युरोप खंडावर हिंदुपती शाहू हे केसरिया ग्रहण बनूनचं राहिले होते., फेसाळत उठणाऱ्या प्रत्येक लाटेवर मराठा हे नाव स्वार होऊनचं युरोपाच्या दरवाज्यावर धडका घेत होते जणू.
#शाहूपर्व
#इतिहासाचा_जागर
#आम्हीच_ते_वेडे_ज्यांना_आस_इतिहासाची
No comments:
Post a Comment